गुरुवार, ८ मार्च, २०१८

सावित्री क्रांतीची मशाल...




भारतात ज्या महनीय स्त्रिया होऊन गेल्यात त्यापैकी राष्ट्रपती जोतीराव फुले यांच्या सहचारिणी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा उल्लेख केल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार ना
ही.ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते.स्त्रियांना शिक्षणापासून,त्यांच्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले जात होते त्या काळात दि.३ जानेवारी १८३१ साली सवित्रीमाईंचा जन्म झाला.
     त्या काळात बालविवाहाची प्रथा होती.त्यामुळे सावित्रीमाई आठ - नऊ वर्षाची होताच त्यांच्या लग्नाचा विचार त्यांच्या आईवडिलांनी केला.त्याचवेळी जोतिबांचे वडील गोविंदराव फुले आणि त्यांची मावसबहीण सगुणाबाई क्षीरसागर हे जोतींसाठी मुलगी शोधत होते.सगुणाबाई धनकवडीच्या पाटलांची मुलगी.नेवसे पाटील आणि धनकवडीचे पाटील यांचं पूर त्यांनी १८५१ आणि ५२ साली मुलींच्या तीन शाळा काढल्या.यातली पहिली शाळा अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात होती.दुसरी रास्ता पेठेत आणि तिसरी वेताळपेठेत होती.
     शूद्रातिशूद्रांच्या मुलामुलींनी शिकू नये यासाठी प्रतिगाम्यांनी,सनातन्यांनी नाना प्रकारचे प्रयत्न केले. "मुली शिक्षण घेऊ लागल्या हा भ्रष्टाचार होय.विद्या हि शुद्रांच्या आणि अतिशूद्रांच्या घरी चालली.हा भयंकर अनर्थ सुरु झाला आहे.हि अपूर्व अशुभाची चाहूल आहे.आता सर्वनाश होणार.जगबुडी होणार." असा भयंकर प्रचार सनातन्यांनी चालवला होता.
     सावित्रीमाई ह्या एक स्त्री होत्या आणि एका स्त्रीनं शाळेत शिकवण ही गोष्ट सनातन्यांना पटणं केवळ अशक्य होत.त्यांनी त्यांचा भयंकर छळ केला.सावित्रीमाई शाळेत जाताना लोक त्यांच्यावर थुंकत, शेण मारत. चिखल फेकत.दररोज अंगावरील साडी शेणाने,चिखलाने भरून जाई.परंतु अशा गोष्टींना सावित्रीमाई घाबरल्या नाहीत.सनातन्यांच्या अशा घाणेरड्या वृत्तीला न घाबरता त्यांनी ज्ञानदानाच कार्य सुरूच ठेवलं.दिनदुबळ्या समाजातील मुलांना समतेच,नव्या जीवनाचं स्वप्न पाहता याव यासाठी सवित्रीमाईनी खूप कष्ट केले.
     १८९७ साली महाराष्ट्र प्लेगच्या साथीनं हवालदिल झाला होता.१८९७ हे वर्ष मरणाच्या पावसानच सुरु झालं होत.सर्वत्र हाहाकार उडाला होता.प्लेग ने गाठी येत अन लोक पटापट मरत.सवित्रीमाईंचा मुलगा डॉ.यशवंत त्यावेळी नगरला लष्कराच्या नोकरीत होता.त्याला त्यांनी बोलावून घेतले आणि वानवडी - घोरपडे परिसरातील माळरानात दवाखाना सुरु केला.अस्पृश्यांच्या आणि गोरगरिबांच्या वस्तीत प्लेगच्या साथीचा मोठाच जोर होता.कुटुंबाच्या कुटुंब साथीत ओस पडली होती.प्रेत न्यायला माणसं नसत.
     मुंढवे येथे साथींच्या या रोगात भयंकर उग्र रूप धारण केलं होत.तेथील अस्पृश्यांच्या वस्तीतील बाबाजी गायकवाडांच्या घरी सावित्रीमाई गेल्या होत्या.त्यांच्या पांडुरंग नावाच्या  मुलाला प्लेगची बाधा झाली होती.आणि त्याला यशवंताच्या दवाखान्यात नेण्यासाठी सावित्रीमाईंनी त्या मुलाला खांद्यावर घेतलं.प्लेग संसर्गजन्य असतो हे माहित असतानासुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता खांद्यावरती घेऊन गेल्या.पण पांडुरंग दुसऱ्या दिवशी दगावला.प्लेग संसर्गजन्य असतो अन पांडुरंगाला दवाखान्यात नेट असताना त्यांनाही प्लेगची लागण झाली.आयुष्यभर त्यांनी दिनदुबळ्यांच्या मेलेल्या आयुष्यांना जिवंत केलं होत.शेवटी त्या पांडुरंगाला वाचवता वाचवता त्यानांच मृत्यू आला.
     आयुष्यभर सावित्रीमाई अस्पृश्य,दिनदुबळ्या गरिबांसाठी झटत राहिल्या.ज्या सनातन्यांनी गोरगरीब अस्पृश्य जनतेला मोडून टाकलं होत.त्या मोडलेल्या मनांना सवित्रीमाईंनी उभं केलं.त्यांना चालायला शिकवलं.बोलायला शिकवलं. वाचायला शिकवलं. अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं.अन्यायग्रस्ताना सवित्रीमाईंनी सामाजिक युद्धाच्या रणभूमीवर आणलेलं पाहून सनातन्यांचंही जग हादरल होत.
     अशा या मायाळू,दयाळू,कनवाळू,कष्टाळू सावित्रीमाईला विनम्र अभिवादन,कोटी कोटी प्रणाम!

         - गिरीश अमिता भाऊ कांबळे
                ०३/०१/२०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पत्रकार बाबासाहेब आंबेडकर...!

२० व्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यलढ्यासोबतच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या चळवळीनं ढवळून निघत होता. अनेक वर्तमानपत्र, मासिकं, पु...