शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

खरा उपाशी कोण..?? शेतकरी कि आमदार??

खरा उपाशी कोण..??         शेतकरी कि आमदार??






    दोन चार दिवस सतत मनात विचार येतोय या भाद्खाऊ आमदारांना गरी म्हणाव कि शेतकर्याना? विधानसभेत नेहमी एकमेकांच्या विरोधात बोलणारे हे मंत्री स्वतःच्या वेतनवाढीच्या वेळी बरे एकमत होतात.विधानसभा सदस्यांच्या वेतनवाढीत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेऊन सरकारने राज्यात दिवाळी काय गणपती आधीच फटाके फोडले आहेत.आमदारांच्या वेतन व वेतनेत्तर सुविधांबाबत नेहमी एकमताने निर्णय घेणारे हे सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षाचे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र कधीच एकमताने निर्णय घेताना दिसत नाहीत.आणि हे खूप मोठ दुख आहे. या पावसाळी अधिवेशनात शेतकर्यांसाठी चांगले निर्णय झाले तर नाहीतच पण आमदारांच्या मनासारखे निर्णय मात्र नक्की झालेत.यावरून अस स्पष्ट होतंय, या पावसाळी अधिवेशनात शेतकरी उपाशी अन आमदार तुपाशी.

    गेल्या चारपाच वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव अस्मानी आणि सुलतानी अशा संकटांचा सामना करीत आहे. त्यात कर्जाचा डोंगर यामुळे त्यांना अधिक आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. मात्र ह्याची काळजी आपल्या गरीब आमदाराना नाही आहे. यंदा सहा महिन्यात दीड हजारांहून अधिक शेतकर्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. शेतकर्यानपुढी संकटे , समस्या वाढतच असताना संपलेल्या पावसाळी अधिवेशनात शेतकर्याना दिलासा देणारा एकही निर्णय विधीमंडळात झालेला नाही हि मोती शोकांतिका आहे.ऐन दुष्काळात चारा छावण्या नाकारणार्या आणि शेतकर्याना मदत देताना तिजोरीकडे बोट दाखवणार्या राज्य सरकारकडून भरल्या पोटी ढेकर देणाऱ्या आमदाराना मात्र घसघशीत वेतनवाढ दिली जात असेल तर या निर्णयाची खंत वाटल्या वाचून राहणार नाही.
     
                                                       गिरीश अमिता भाऊ कांबळे 
                                                                     (पोंभुर्ले)
                                                                ०७/०८/२०१६ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पत्रकार बाबासाहेब आंबेडकर...!

२० व्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यलढ्यासोबतच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या चळवळीनं ढवळून निघत होता. अनेक वर्तमानपत्र, मासिकं, पु...