शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

आंबेडकर जयंती विशेष

तु विश्वरत्न, तु ज्ञानसुर्या,
तु संविधानकर्ता, तु आमचा उद्धारकर्ता
तु कोटी दीनांचा पिता,
तु महानायक ह्या सृष्टीवरचा,
तु महामानव ह्या भू तलावरचा,
तु युगपुरुष,तु विश्वभूषण,
तु महान अर्थशास्त्रतज्ञ,
तु महान इतिहासकार,
तु सिम्बॉल ऑफ नॉलेज,
तु कायदेपंडीत,तु महान तत्वज्ञ,
तु कैवारी मानवी हक्कांचा,
आम्हा दीनदुबळ्यांचा...
तु समाजशास्त्रज्ञ, तु शिक्षणतज्ज्ञ,
तु बॅरिस्टर,तु जलतज्ज्ञ, तु कृषितज्ञ...
तु ह्या शब्दांच्या परिघाच्या पण बाहेरचा,
तुला हे शब्द सुध्दा कमी पडतील...
तु ह्या शब्दांचा पण राजा...
तुला इथं मूर्त्यांमध्ये,पुतळ्यांमध्ये शोधतात पण
मी तुला पुस्तकांमध्ये शोधतो....
तु त्या सर्व पुस्तकांचा पण राजा...
तु समतेचा रथ,
तु स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता,
तु पुरस्कर्ता करुणेचा,
तु पुरस्कर्ता बुद्धाचा...
तु पुरस्कर्ता बुद्धाचा...
तु पुरस्कर्ता बुद्धाचा...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांस मंगलमय सदिच्छा …
  

  --गिरीश अमिता भाऊ कांबळे

            १४/०४/२०१८

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

स्वातंत्र्य...


    स्वातंत्र्य...???

स्वातंत्र्याचं काही विचारू नका राव
इथ निषेध जरी नोंदवला
तरी देशद्रोही म्हणून घोषित होत नाव
स्वातंत्र्याच्या नावाखाली
आजही जाळताहेत आमचे हक्क
मारताहेत माणसा सारखी माणसं
पालोपाचोळ्यासारखी...
होतोय बलात्कार भरदिवसा
देत आहेत बलात्काराच्या धमक्या
बिनधास्तपणे...
होतोय अत्याचार आजही
पूर्वी उघड उघड अन आता लपून
लोकशाहीचे पाईक आम्ही
आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवताहेत...
स्वतंत्र भारतात अजून कसल स्वातंत्र्य पाहिजे
बोलणाऱ्या फोकदारीच्यांनो
स्वातंत्र्याच्या खोट्या बाता करत
राष्ट्रभक्तीची कसली प्रमाणपत्र वाटता
इथं भर दिवसा खून होतो 
तेव्हा कुठे शेण खायला जाता...
खबरदार स्वतंत्र भारतात स्वातंत्र्य आहे बोललात तर
इथे आम्हाला कालही स्वातंत्र्य नव्हत अन आजही...

               - गिरीश अमिता भाऊ कांबळे
                          (पोंभुर्ले)


स्वातंत्र्य भारतातील हुकूमशाहीला, संविधानाच्या विरोधात असणाऱ्यांना, संविधान जळणाऱ्यांना आणि त्यावर मूग गिळून गप्प बसणाऱ्या ५६" इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना तसेच त्यांच्या भक्तांना, राष्ट्रभक्ती शिकवणाऱ्यांना, राष्ट्रभक्तीची सर्टिफिकेट वाटणाऱ्यांना, राष्ट्रपतींना देवळात प्रवेश न देणाऱ्यांना, स्वयंघोषित गोरक्षकांना, बलात्कार करणाऱ्यांना, जातीय अत्याचार करणाऱ्यांना, स्वातंत्र्य भारतात जातीयवाद नाही बोलणाऱ्या थोरांना या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय सदिच्छा...!!!💐💐
                    

न्यायासाठी एक व्हा…!!!

न्यायासाठी एक व्हा…!!!

     पुरोगामी महाराष्ट्रात आजही आमच्यावर अन्याय होतोय.आजही आम्हाला न्यायासाठी संघर्ष करावा लागतोय.आजही आम्हाला न्यायासाठी वणवण फिरावं लागतंय.लोकशाहीने नटलेल्या या देशात आम्हाला आजही न्याय मिळत नाही आहे.आजही आम्हला कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागताहेत.अस आपल्यापुरतच का होत असावं? आपल्यालाच न्याय का मागावा लागतोय? तर याची माझ्या मते द9न करणे आहेत.
१)आपण अन्याय झाला तरी गप्प बसून राहतो.
२)आपण अजूनही एक नाही आहोत.
बाबासाहेब नेहमी आपल्या कार्यकर्त्यांना बोलत असत कि, “एकीत जय अन बेकीत क्षय”.आता आपल्याला एक व्हायची वेळ आलेली आहे.अन्यायाला वाचा फोडण्याची वेळ आली आहे.आपल्याला राठीवडे आणि पोंभुर्ले या दोन गावांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायची आहे.आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे त्या दोन अन्यायग्रस्त गावांना.त्या दोन लेकरांना पोरकं केलं त्या नराधमांना शिक्षा देण्यासाठी आपल्याला एक व्हायच आहे.त्या दोन लहान मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला एक व्हायच आहे.एक व्हायचं आहे आपल्याला त्यांच्यासाठी ज्यांची जमीन बळकावली.एक व्हायचय आहे आपल्याला त्यांच्यासाठी ज्यांना निरपराध असताना अटक केली त्यांच्यासाठी.
     आजपर्यंत आपण अन्यायच सहन करत आलोय.आजपर्यंत आपण अन्याय झाला तरी मुकं राहणेच पसंत केलय. पण आता नाही.बस्स झाला हा अन्याय.या अन्यायाची चीड आता माझया नसानसांत भरलीय.आता मला पुन्हा राठीवडे अन पोंभुर्ले व्हायला द्यायचं नाही आहे.त्यासाठी मी एक होणार आहे आणि तुम्हीही होणार आहात. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक व्हायचंय.अन्याय करणार्यांना चपराक बसण्यासाठी एक व्हायचंय.
     यासाठीच “अन्याय,अत्याचार निवारण समिती व कोकण अन्याय संघर्ष लढा” या डॉन संघटनांनी पोंभुर्ले व राठीवडे या दोन गावांना न्याय मिळवून देण्यासाठी दि.१६ मे २०१७ रोजी ओरोस,सिंधुदुर्गनगरी येथे “आक्रोश मोर्चा” आयोजित केला आहे.हा मोर्चा म्हणजे न्यायासाठी आक्रोश करणाऱ्यांचा मोर्चा आहे.हा मोर्चा केवळ एका जातीपुरता नसून,अन्यायावर वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा आहे.हा एल्गार असणार आहे अन्यायग्रस्त पिडितांचा. हा एल्गार आहे अन्यायावर प्रतिकार करणाऱ्यांचा. “न्याय मागून मिळत नसतो तर तो लढून मिळतो”.यासाठीच आपल्याला एक व्हायचं आहे.अन्याय सहन करून बोथट झालेल्या संवेदनांना आता धार काढण्याची वेळ आलेली आहे.त्यासाठीच आपल्याला १६ मे २०१७ ला ओरोस येथे “आक्रोश मोर्चात” सामील व्हायचंय.
          -गिरीश भाऊ कांबळे
                  (पोंभुर्ले)
            ०८/०५/२०१७








न्याय…???
न्याय म्हणजे काय
हे अजूनही समजलं नाय…
या न्यायाच्या प्रतीक्षेत
मी अजूनही फिरतोय
वकिलांच्या दारोदारी…
झिझवतोय कोर्टाच्या पायऱ्या
अन पायाचे तळवे...
या न्यायासाठी 
मी आजही काढतोय मोर्चे
बायका पोरांसोबत
रखरखत्या उन्हात
जीवाची तमा न बाळगता
करतोय आंदोलन
अन्यायाच्या विरोधात
संविधानिक स्वरूपात
आता मात्र या अन्यायाची
चीड भरलीय नसानसांत
म्हणून पुकारलंय मी युद्ध
अन्यायाविरोधात
संविधानाच्या मैदानात…
      
     -गिरीश भाऊ कांबळे
          (पोंभुर्ले)
     [२७/१०/२०१६]
   
 

खरा उपाशी कोण..?? शेतकरी कि आमदार??

खरा उपाशी कोण..??         शेतकरी कि आमदार??






    दोन चार दिवस सतत मनात विचार येतोय या भाद्खाऊ आमदारांना गरी म्हणाव कि शेतकर्याना? विधानसभेत नेहमी एकमेकांच्या विरोधात बोलणारे हे मंत्री स्वतःच्या वेतनवाढीच्या वेळी बरे एकमत होतात.विधानसभा सदस्यांच्या वेतनवाढीत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेऊन सरकारने राज्यात दिवाळी काय गणपती आधीच फटाके फोडले आहेत.आमदारांच्या वेतन व वेतनेत्तर सुविधांबाबत नेहमी एकमताने निर्णय घेणारे हे सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षाचे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मात्र कधीच एकमताने निर्णय घेताना दिसत नाहीत.आणि हे खूप मोठ दुख आहे. या पावसाळी अधिवेशनात शेतकर्यांसाठी चांगले निर्णय झाले तर नाहीतच पण आमदारांच्या मनासारखे निर्णय मात्र नक्की झालेत.यावरून अस स्पष्ट होतंय, या पावसाळी अधिवेशनात शेतकरी उपाशी अन आमदार तुपाशी.

    गेल्या चारपाच वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव अस्मानी आणि सुलतानी अशा संकटांचा सामना करीत आहे. त्यात कर्जाचा डोंगर यामुळे त्यांना अधिक आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. मात्र ह्याची काळजी आपल्या गरीब आमदाराना नाही आहे. यंदा सहा महिन्यात दीड हजारांहून अधिक शेतकर्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. शेतकर्यानपुढी संकटे , समस्या वाढतच असताना संपलेल्या पावसाळी अधिवेशनात शेतकर्याना दिलासा देणारा एकही निर्णय विधीमंडळात झालेला नाही हि मोती शोकांतिका आहे.ऐन दुष्काळात चारा छावण्या नाकारणार्या आणि शेतकर्याना मदत देताना तिजोरीकडे बोट दाखवणार्या राज्य सरकारकडून भरल्या पोटी ढेकर देणाऱ्या आमदाराना मात्र घसघशीत वेतनवाढ दिली जात असेल तर या निर्णयाची खंत वाटल्या वाचून राहणार नाही.
     
                                                       गिरीश अमिता भाऊ कांबळे 
                                                                     (पोंभुर्ले)
                                                                ०७/०८/२०१६ 

पत्रकार बाबासाहेब आंबेडकर...!

२० व्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यलढ्यासोबतच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या चळवळीनं ढवळून निघत होता. अनेक वर्तमानपत्र, मासिकं, पु...