शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

न्यायासाठी एक व्हा…!!!

न्यायासाठी एक व्हा…!!!

     पुरोगामी महाराष्ट्रात आजही आमच्यावर अन्याय होतोय.आजही आम्हाला न्यायासाठी संघर्ष करावा लागतोय.आजही आम्हाला न्यायासाठी वणवण फिरावं लागतंय.लोकशाहीने नटलेल्या या देशात आम्हाला आजही न्याय मिळत नाही आहे.आजही आम्हला कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागताहेत.अस आपल्यापुरतच का होत असावं? आपल्यालाच न्याय का मागावा लागतोय? तर याची माझ्या मते द9न करणे आहेत.
१)आपण अन्याय झाला तरी गप्प बसून राहतो.
२)आपण अजूनही एक नाही आहोत.
बाबासाहेब नेहमी आपल्या कार्यकर्त्यांना बोलत असत कि, “एकीत जय अन बेकीत क्षय”.आता आपल्याला एक व्हायची वेळ आलेली आहे.अन्यायाला वाचा फोडण्याची वेळ आली आहे.आपल्याला राठीवडे आणि पोंभुर्ले या दोन गावांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायची आहे.आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे त्या दोन अन्यायग्रस्त गावांना.त्या दोन लेकरांना पोरकं केलं त्या नराधमांना शिक्षा देण्यासाठी आपल्याला एक व्हायच आहे.त्या दोन लहान मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला एक व्हायच आहे.एक व्हायचं आहे आपल्याला त्यांच्यासाठी ज्यांची जमीन बळकावली.एक व्हायचय आहे आपल्याला त्यांच्यासाठी ज्यांना निरपराध असताना अटक केली त्यांच्यासाठी.
     आजपर्यंत आपण अन्यायच सहन करत आलोय.आजपर्यंत आपण अन्याय झाला तरी मुकं राहणेच पसंत केलय. पण आता नाही.बस्स झाला हा अन्याय.या अन्यायाची चीड आता माझया नसानसांत भरलीय.आता मला पुन्हा राठीवडे अन पोंभुर्ले व्हायला द्यायचं नाही आहे.त्यासाठी मी एक होणार आहे आणि तुम्हीही होणार आहात. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक व्हायचंय.अन्याय करणार्यांना चपराक बसण्यासाठी एक व्हायचंय.
     यासाठीच “अन्याय,अत्याचार निवारण समिती व कोकण अन्याय संघर्ष लढा” या डॉन संघटनांनी पोंभुर्ले व राठीवडे या दोन गावांना न्याय मिळवून देण्यासाठी दि.१६ मे २०१७ रोजी ओरोस,सिंधुदुर्गनगरी येथे “आक्रोश मोर्चा” आयोजित केला आहे.हा मोर्चा म्हणजे न्यायासाठी आक्रोश करणाऱ्यांचा मोर्चा आहे.हा मोर्चा केवळ एका जातीपुरता नसून,अन्यायावर वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा आहे.हा एल्गार असणार आहे अन्यायग्रस्त पिडितांचा. हा एल्गार आहे अन्यायावर प्रतिकार करणाऱ्यांचा. “न्याय मागून मिळत नसतो तर तो लढून मिळतो”.यासाठीच आपल्याला एक व्हायचं आहे.अन्याय सहन करून बोथट झालेल्या संवेदनांना आता धार काढण्याची वेळ आलेली आहे.त्यासाठीच आपल्याला १६ मे २०१७ ला ओरोस येथे “आक्रोश मोर्चात” सामील व्हायचंय.
          -गिरीश भाऊ कांबळे
                  (पोंभुर्ले)
            ०८/०५/२०१७








न्याय…???
न्याय म्हणजे काय
हे अजूनही समजलं नाय…
या न्यायाच्या प्रतीक्षेत
मी अजूनही फिरतोय
वकिलांच्या दारोदारी…
झिझवतोय कोर्टाच्या पायऱ्या
अन पायाचे तळवे...
या न्यायासाठी 
मी आजही काढतोय मोर्चे
बायका पोरांसोबत
रखरखत्या उन्हात
जीवाची तमा न बाळगता
करतोय आंदोलन
अन्यायाच्या विरोधात
संविधानिक स्वरूपात
आता मात्र या अन्यायाची
चीड भरलीय नसानसांत
म्हणून पुकारलंय मी युद्ध
अन्यायाविरोधात
संविधानाच्या मैदानात…
      
     -गिरीश भाऊ कांबळे
          (पोंभुर्ले)
     [२७/१०/२०१६]
   
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पत्रकार बाबासाहेब आंबेडकर...!

२० व्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यलढ्यासोबतच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या चळवळीनं ढवळून निघत होता. अनेक वर्तमानपत्र, मासिकं, पु...